शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; महेंद्र ब्राह्मणवाडेंची चंद्रपुरात पत्रकार परिषद.

गडचिरोली जिल्ह्यासह चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूर येथे महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, शेतीमालाला योग्य भाव, धान खरेदी, आरोग्य सुविधा, रस्ते व महामार्ग, शेतजमिनीशी संबंधित प्रश्न, नुकसानभरपाई,कृषीविषयक प्रलंबित मागण्या तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असून, अनेक भागांमध्ये सिंचन, शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठ आणि शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी निर्माण होत आहेत.
त्याचप्रमाणे चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अवैध बनावटी तंबाखू, गुटखा व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर कठोर प्रतिबंध घालून प्रभावी कारवाई करण्यात यावी. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होऊन कॅन्सरसह तंबाखूजन्य विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यास उपाययोजना करावी, रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सध्या देण्यात येणारी ₹२५ लाखांची आर्थिक मदत वाढवून ₹५० लाख करण्यात यावी. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी, गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि भंडारा परिसरातून प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाबाबत स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावा. शेतकऱ्यांची जमीन, त्यांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम तसेच स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच महामार्गाचा मार्ग निश्चित करावा. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, MIDCची जागा उपलब्ध असतानाही गेल्या १५ वर्षांत एकही मोठा उद्योग उभारला नाही. त्यामुळे स्थानिक युवक व बेरोजगारांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे. MIDC परिसरात नवीन उद्योग आणून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या सर्व प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि शेतीशी निगडित प्रश्नांबाबत शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडण्यात अली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता संबंधित विभागांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे यावेळी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शंतनू धोटे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागभीड प्रमोद चौधरी, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर प्रशांत डवले, माजी जिल्हा महासचिव युवक काँग्रेस रोहन नन्नावरे, कार्याध्यक्ष चिमूर युवक काँग्रेस सजित कारेकार, विधानसभा महासचिव चिमूर कुंदन पडवेकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली अनिल कोठारे,ओ. बि. सी. जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली दिवाकर निसार, विपुल येलटीवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सावली प्रमोद दाजगाये, युवक विधानसभा उपाध्यक्ष चिमूर अमर नवघडे, युवराज घोटेकर,राजेंद्रनाथ मेश्राम, हरीश मुंडे, अनु. जाती. जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर चेतन खोब्रागडे, हितेश ठाकरे, पवन नवघडे, समिर कुळमेथे, शुभम कुळमेथे, दिपक ठाकरे,सचिन वाटगुरे, भगवान डाकारे, क्रिष्णा कोहपरे,रामाजी हुलके,राजेश भोंडे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.
